यावल तत्कालीन तलाठ्यावर गुन्हा दाखल करणे संदर्भात तहसीलदारांनी मागितला खुलासा


सनद नसताना भूखंडाची पाने उघडल्याचा परिणाम

यावल (सुरेश पाटील) यावल येथील तत्कालीन तलाठी तथा रावेर तालुक्यात ऐनपुर येथे कार्यरत असलेले शरद विठ्ठल सूर्यवंशी तसेच तत्कालीन मंडळ अधिकारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याबाबत यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझिरकर यांनी दि.३० जानेवारी २०२४ रोजी लेखी पत्र काढून तीन दिवसाच्या आत समक्ष खुलासा सादर करावा असे कळविले आहे.[ads id="ads1"] 

           दिलेल्या पत्रात म्हटले आहे की यावल येथील गट नंबर ६७६ ला तात्पुरती बिनशेती आदेशातील नियम अटी शर्तीतील अनुक्रमांक २८ चे उल्लंघन केल्याबाबत व सक्षम अधिकाऱ्याची अंतिम सनद नसताना भूखंडाचे पाने ओपन केल्याबाबत यावल तहसील कार्यालयात तक्रार प्राप्त झाली आहे तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सदर अर्जाबाबत आपला खुलासा या कार्यालयात ३ दिवसाच्या आत समक्ष सादर करावा आपला खुलासा मुदतीत प्राप्त न झाल्यास आपल्या विरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सुद्धा दिलेल्या पत्रात यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझिरकर यांनी नमूद केले आहे.[ads id="ads2"] 

        याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल येथील पंकज श्रावण सोनार अनिल मधुकर मोरे यांनी दि. ८ जानेवारी २०२४ रोजी यावल तहसीलदार संबंधित अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्ज केले होते आणि आहे की यावल नगरपरिषद हद्दीतील गट क्र.६७६ ला जिल्हाधिकारी जळगाव यांनी दि.१५ मार्च २०१४  रोजी तात्पुरता १ वर्षाकरिता बिनशेती आदेश मंजूर केला होता, त्या आदेशामध्ये जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या आदेशातील अटी शर्ती नियम क्र.२८ मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे की सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय भुखंडाची पाने उघडण्यात येऊ नये म्हणजेच  ७/१२ उतारे तयार करण्यात येऊ नये.

        असे स्पष्ट नमूद असताना  यावल येथील तत्कालीन तलाठी शरद विठ्ठल सूर्यवंशी व यावल तत्कालीन मंडळ अधिकाऱ्याने जागामालक यांच्याशी संगनमत व आर्थिक व्यवहार करून गट क्र.६७६ बिनशेती अंतिम आदेश नसताना सदर भूखंडाची पाने ७ /१२ उतारे दि.३० जून २०१४  रोजी नोंद क्र. १५३४८ याप्रमाणे बेकायदेशीर भूखंडाची पाने उघडली आहे.

जळगाव जिल्ह्यातील व्हिडिओ बातम्यांसाठी येथे क्लिक करा

       तलाठी शरद सूर्यवंशी व तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यांनी शासनाची महसूल खात्याची व जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाची पायमल्ली करून शासनाची फसवणूक केली आहे तरी त्यांच्या वरील संदर्भीय विषयास अनुसरून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा तलाठी यांना निलंबित करण्यात यावे अशी कागदपत्रांसह तक्रार दिली आहे त्यानुसार त्या तक्रार अर्जाची दखल घेत यावल तहसीलदार यांनी तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी यांना लेखी पत्र देऊन तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे कळविल्याने पुढील कार्यवाही काय..? याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️