भुसावळ तालुक्यातील एका गावात विनयभंगानंतर १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"]
या संदर्भात अधिक वृत्त असे की, १ फेब्रुवारी रोजी युवराज उर्फ गोलू रविंद्र नेहते (वय २३) याने दुपारी साडेदहा ते अडीच वाजेच्या दरम्यान, आरोपीने लैगीक गैरवर्तन करण्याचे उद्देशाने अनधिकृतपणे प्रवेश केला.[ads id="ads2"]
त्यानंतर पिडीतेला काही तरी आमीष दाखवून तिचा विनयभंग केला. त्या गोष्टीचा अल्पवयीन पिडीत मुलीने मनस्ताप करून घेवून राहत्या घरात छताच्या कडीला ओढणीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस स्थानकात युवराज उर्फ गोलू रविंद्र नेहते विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह भादवि कलम ३०५,३०६,३५४ (अ),(१), (i), ४५२ सह पोस्को ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अमोल पवार हे करीत आहेत.